HW News Marathi
महाराष्ट्र

रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, सरकार को सन्मती दे भगवान, मनसेच्या अनोख्या शुभेच्छा!

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छांमध्ये संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या निवडणूकपूर्व टोलमुक्त महाराष्ट्राच्या वचनाची आठवण करुन दिली आहे. तसेच सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधींना अभिवादन म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचा टोलमुक्तीचं वचन देणारा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

“रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. सरकार को सन्मती दे भगवान. सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन.” असे संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे. तसेच त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत उद्धव ठाकरे निवडणूक प्रचाराच्या सभेला संबोधित करताना सर्वांना आपल्या वचननाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राचं वचन असल्याचं सांगतात. तसेच आपलं सरकार राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी येणार असून ते आल्यावर महाराष्ट्र टोलमुक्त करु, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसैनिक हा माझा प्राण आहे, माझी संपत्ती आहे आणि ऊर्जा आहे – बाळासाहेब ठाकरे

News Desk

पालक व शिक्षण विभागाने सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका ठेवावी! – डॉ.नीलम गोऱ्हे

Aprna

दरेकरांची राष्ट्रवादीवर टीका करताना जीभ घसरली, चंद्रकांत पाटील म्हणतात….

News Desk