HW News Marathi
महाराष्ट्र

मोदी, फडणवीसांवर गुन्हा दाखल करावा

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी मंगळवारी आत्महत्या केली. चायरे कुटुंबियांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षानी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. ‘कुटुंबियांच्या मागणी प्रमाणे चायरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करावा’, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या अगोदर सात महिन्यांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील टिटवी गावातील प्रकाश मानगावकर या शेतकऱ्यांने आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये त्यांनी मोदींचे नाव लिहून आपली जीवनयात्रा संपली होती. भाजपच्या काळात राज्यात १३ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन राज्यातील अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.

गेले तीन दिवस चायरे कुटुंबियांनी शंकर चायरे यांचा मृतदेह ताब्यात घेतला गेला नाही. सरकारतर्फे किशोर तिवारी यांनी पाठवण्यात आले होते. पण गावक-यांनी त्यांना पिटाळून लावले. या आधीही प्रकाश मानगावकर यांच्या आत्महत्या प्रकरणात हेच किशोर तिवारी सरकारचे प्रतिनिधी म्हणून मानगावकर यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांच्या पत्नीला नोकरी,मुलांचे शिक्षणासाठी मदत इत्यादी आश्वासने देऊन आले होते. मात्र त्यानंतर सरकारने ही शेतकरी आत्महत्या मानण्यासच नकार दिला.

गेल्या दोन दिवसात राज्य सरकारकडून किमान पालकमंत्र्यांनी तरी चायरे कुटुंबियांची भेट घ्यायला हवी होती. पण सरकारमध्ये ती संवेदनशीलता ही राहिली नाही. शेतक-यांच्या मृतदेहाच्या विटंबनेला सरकार जबाबदार आहे, असे अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ला यवतमाळमधून सुरुवात

यवतमाळमध्ये ज्या ठिकाणी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे मोदीनीं २०१४ साली आपल्या प्रचाराची आणि देशाला दिलेल्या आश्वासनांची सुरुवात केली. त्याच यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकरी पंतप्रधानांचे नाव सुसाईड नोटमध्ये नाव लिहून आत्महत्या करतात ही दुर्देवाची बाबा असल्याचे अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पृथ्वीराज चव्हाणांना निवडून येण्यासाठी शरद पवारांची गरज लागते…काॅंग्रेसच्या ज्येष्ठांवर सेनेचा घणाघात !

News Desk

“एखाद्या पदासाठी कुणासमोर हात पसरविण्याचं संस्कार आमच्या रक्तात नाही!” – पंकजा मुंडे

News Desk

मंत्री धनंजय मुंडे CSMT स्थानकावर हमाल मंडळींशी गप्पा मारण्यात रमतात तेव्हा…!

News Desk