HW News Marathi
महाराष्ट्र

मोदींचे सरकार आले, आता अयोध्येत राम मंदिर होणारच !

मुंबई | “युती करतानाची भावना महत्त्वाची आहे, भावनेशिवायच्या युतीला अर्थ नाही,” युतीबाबातचे असे स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५३व्या वर्धापन सोहळ्यात दिले आहे. ठाकरे पुढे असे देखील म्हणाले की, “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आले तर अयोध्येत राम मंदिर होणारच असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेंनी युती झाली आणि विखे पाटील भाजपमध्ये आल्याच आनंद व्यक्त केला.”

आता पवार कंपनीला घेऊ नका, ठाकरेंनी असा उपहासात्मक टोला लगावला. युती झाली म्हणजे मैदान साफ झाले असे समजू नका. कारण वेडेवाकडे पळत असताना पायात पाय घालून पडण्याची भीती अधिक असे म्हणात ठाकरेंनी कार्यकर्त्यांना निवंत न राहता पुन्हा विधानसभेतसाठी कामाला लागा असा आदेश दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वर्धापन दिनाला उपस्थित आहेत. शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्रीही मार्गदर्शन करणार आहेत.

 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाची सांगता
  • सत्तेत समसमान वाटप झाले पाहिजे अशी अपेक्षाही केली व्यक्त
  • आपण तुटणार नाही, फुटणार नाही आणि घेतलेला हिंदुत्वाचा वसा टाकणार नाही अशी शपथ घेण्याचे केले आवाहन
  • विजयामध्ये शिवसैनिकांचा महत्वाचा वाटा असल्याचे त्यांनी केले कौतुक
  • युतीतील दुरावा आता दूर झाला आहे, विजयानंतर भाजपचे खासदारही भेटायला आले
  • शिवसेनेच्या व्यासपीठावर अनेकदा भाजपचे नेते आले आहेत
  • ओवैसी हिंदूचा अपमान करत असताना आम्ही गप्प बसणार नाही
  • लोकसभा निवडणुकीत देशद्रोह्यांच्या पराभव झाल्याचा आनंद
  • कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असल्याने कलम 370 रद्द करणारच
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्या नालायकांचा पराभव झाला आहे
  • यापुढे युतीत वाद होणार नाहीत, याची आम्ही काळजी घेतली आहे.
  • काही काम करायची आहेत, याचा आमचा निर्णय झाला आहे.
  • काहीजण याबाबत शंका उपस्थित करत आहेत, सरकारचे काम तर सुरु होऊ द्या
  • मोदी यांचे सरकार आल्याने आता राममंदिर झालेच पाहिजे
  • आता युती झाली आहे. मैदान साफ आहे, त्यामुळे पायात पाय अडकण्याचा धोका असतो
  • आता वेडात मराठे सात नाही, तर एकसाथ दौडणार आहेत.
  • समस्या सोडवल्यानंतर कशाला भांडायचे, आता विरोधीपक्षच नाही
  • मुख्यमंत्री आणि अमितश शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर समस्या सोडवण्याचे काम सुरू झाले
  • आमचा वाद सत्तेसाठी नव्हता, जनतेच्या समस्यांसाठी होता
  • युती करतानाची भावना महत्त्वाची आहे, भावनेशिवायच्या युतीला अर्थ नाही
  • प्रत्येक शिवसैनिक प्रेम करताना जीव लावतो, तर लढताना जीवही देतो
  • आनंदाच्या क्षणी शिवसेनाप्रमुखांची आठवण होते.
  • संघर्षाशी मुकाबला करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांना साथीदार दिले आहेत.
  • या कार्यक्रमाचे श्रेय तुम्हाला आहे.
  • शिवसेना वर्धापनदिनाच्या उपस्थितांना दिल्या शुभेच्छा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा- चंद्रकांत पाटील

News Desk

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सक्षमीकरण उपक्रम! – नवाब मलिक

Aprna

“…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला कोणताही धोका नाही”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

News Desk