HW News Marathi
महाराष्ट्र

सामनाच्या संपादकपदी आता मिसेस मुख्यमंत्री! रश्मी ठाकरेंकडे नवी जबाबदारी..

मुंबई | आजपासून सामनाच्या संपादकपदी मिसेस ठाकरे विराजमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या दैनिक सामनाच्या संपादक असणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामनाचे संपादकपद ठेवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आता रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक असणार आहेत. आजपासून त्यांच्याकडे हे पद सुपूर्द करण्यात आलं आहे.

सामनाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे सामनाच्या संपादकपदी होते. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक राहिले. पण आता मुख्यमंत्री झाल्यामुळे लाभाच्या पदावरून अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी उद्धव ठाके यांनी सामनाचे संपादकपद सोडले होते तेव्हापासुन संजय राऊत यांच्यावर संपुर्ण जबाबदारी होती. आता मात्र तब्बल ४ महिन्यांनंतर हे संपादकपद रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे. आजच्या सामनामध्ये संपादक सौ रश्मी ठाकरे असा उल्लेखदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे त्या सामनाचं कामकाज कसं पाहतात हे बघणं महत्त्वाचं आहे.

सामना हे बाळासाहेब आाणि शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडणारे माध्यम आहे. त्यांच्यानंतर हा वसा उद्धव ठाकरेंनी जपला. आता रश्मी ठाकरे या शिवसेनेची भूमिका मांडणार आहेत. शिवसेनेची कार्यपद्धती, सामनाचे अग्रलेख यावर आता रश्मी ठाकरे यांचे विचार दिसणार आहेत. त्यामुळे आताचा शिवसैनिक रश्मी ठाकरे यांना कसा स्वीकारतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रायगडमध्ये संशयास्पद बोटीत AK-47 आणि काडतुसे सापडले; राज्यभरात ‘हाय अलर्ट’

Aprna

महाविकासआघाडी सरकारचा खासदार उदयनराजेंना धक्का

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने केला १४०० एकर जमिनीचा व्यवहार ,घोटाळ्यातील नावे जाहीर करणार, निलेश राणेंचा इशारा

News Desk