HW News Marathi
महाराष्ट्र

लोकल प्रवासाच्या वेळेत दिलासा मिळण्याची शक्यता, आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत 

मुंबई | कोरोनामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद झालेली उपनगरी रेल्वेची दारे जवळपास १० महिन्यांनी १ फेब्रुवारीला खुली झाली आहेत. मात्र सर्वसामान्यांना प्रवास करण्यासाठी वेळेचं बंधन असून त्याचं उल्लंघन केल्यास दंड ठोठावला जात आहे. सर्वसामान्यांना सकाळच्या वेळी पहिल्या लोकलपासून ते पहाटे सात वाजेपर्यंतच प्रवास करण्याची मुभा असल्याने नोकरदार वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे लोकलच्या वेळा बदलण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लवकरच लोकल प्रवासाच्या वेळेत दिलासा मिळण्याची शक्यता असून तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“लोकांची सोय हीच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणून पाहिली पाहिजे. जर काही सुधारणा लोकलच्या वेळेत करण्याची गरज असेल तर तशा सूचना करण्यासंदर्भात कळवलं जाईल. लोकांचं हित हेच अंतिम महत्वाचं असतं. त्यामुळे त्याचदृष्टीने काम केलं जाईल. यामुळे काही बदल अपेक्षित असेल तर ते करण्यासाठीचे प्रयत्न असतील,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले की, “लोकलच्या वेळा नक्कीच बदलू शकतात. लोकांचं हित आणि गरज त्यांच्या संदर्भाने सोयीचं असणं महत्वाचा विषय आहे. सुधारणा होण्याची गरज असेल तर आमचा विभागदेखील कळवेल आणि राज्य सरकारही त्यासंदर्भात निर्णय घेईल”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुखेडमध्ये खिचडी खाल्याने 29 विद्यार्थ्यांना विषबाधा

News Desk

राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा ३० डिसेंबरला, सामनाची माहिती

News Desk

राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहाेचल्या! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Aprna