HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंचा ऐतिहासिक निर्णय; वरिष्ठांना ही करावी लागणार नाईट ड्युटी

मुंबई | मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी महिन्याभरापूर्वीच आयुक्त पदाची सूत्रे हाथी घेतल्यानंतर पांडे यांनी पोलीस दलात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. शहर आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक उपायोजना सध्या पोलिसांकडून राबवल्या जात आहेत. त्यातच आता शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मुंबई पोलीस दलातील कनिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणेच सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त यांनाही रात्रपाळी करावी लागणार आहे, असे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिले आहे.

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आता यापुढे वरिष्ठ अधिकारीही धाव घेणार आहेत. रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात गस्त घालावी लागणार आहेत. आयुक्त संजय पांडेही महिन्यातून एकदा रात्रपाळी करणार असल्याची माहिती आहे. सह आयुक्तांना 15 दिवसांतून एकदा, अपर पोलीस आयुक्तांना 10 दिवसांतून एकदा तर डीसीपी आणि एसीपी 7 दिवसांतून किमान एकदा रात्रपाळी करतील असे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिले आहेत.

पोलीस आयुक्तांच्या या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था, गुन्हे, प्रशासन, वाहतूक आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचाही या नाईट ड्युटीच्या आदेशात समावेश करण्यात येणार आहे. या शाखांचे सहआयुक्त देखील गणवेश परिधान करून रात्री ड्युटीसाठी बाहेर पडणार आहेत. मुंबईत पूर्वी डीसीपी स्तरावरील अधिकारी कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी नियमितपणे रात्रीची ड्युटी करत असत. मात्र, आता ती यंत्रणा पुन्हा पूर्ववत होणार असून यासंदर्भातील सूचना लवकरच जारी केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता रात्री घडणाऱ्या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसणार असल्याचे काही वरिष्ठ पोलीस आदीकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील अस्थिरता संपविण्यासाठी ‘नीळकंठ’ व्हायला आम्ही तयार !

News Desk

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याचा शरद पवारांनी घेतला समाचार!

News Desk

“उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून काँग्रेसची लोकं जीवंत झाली”

News Desk