HW News Marathi
महाराष्ट्र

संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई | मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्वी जामीनावर आज (१९ मे) सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी देशपांडे आणि धुरी या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. “न्यायालयाने देशपांडे आणि धुरींना अटी-शर्तीवर दोघांचा जामीन मंजूर केले आहे. देशपांडे आणि धुरींना २३ मेपर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार असून पोलिसांना सहकार्य करावे लागणार आहे,” अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 

यापूर्वी देशपांडे आणि धुरींच्या अटकपूर्व जामीनावर १७ मे रोजी सुनावणी पार पडली होती. तेव्हा न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून घेतला होता. या प्रकरणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.  मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसैनिकांनी ४ मे रोजी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन सुरू होते. मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्कजवळच आज (४ मे) सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पोलिसांनी हूलकावणी देऊन पळून गेले. यावेळी महिला कर्मचाऱ्याला धक्काबुक्की झाली आणि यात महिला कर्मचारी जखमी झाले होती. यानंतर हे दोघेही फरार आहेत. 

सरकारी वकील प्रदीप घरात नेमके काय म्हणाले

प्रदीप घरात म्हणाले, ” न्यायालयाने देशपांडे आणि धुरींना अटी-शर्तीवर दोघांचा जामीन मंजूर केले आहे. देशपांडे आणि धुरींना २३ मेपर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार असून पोलिसांना सहकार्य करावे लागणार आहे. यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला आणि १६ तारखेला शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला जावून हजेरी लावायची आहे. आणि पोलीस जी काही चौकशी त्यात सहकार्य करायचे आहे. आणि या प्रकरणातील रोहित वैष्य आणि साळी त्यांचा देखील जामीन मंजूर झालेला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, चार्शीट पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरतून २ लाख तर सांगलीतून ४ लाख नागरिकांचे स्थलांतर

News Desk

महाराष्ट्रात १० हजार पोलिसभरती करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

News Desk

राज्यपालांचं पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल; राऊतांचा खोचक टोला

News Desk