HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई विद्यापीठावर कालचा गोंधळ बरा होता म्हणण्याची आली पाळी!

मुंबई | मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा पेपरमध्ये गोंधळ सुरू आहे. एकतर कोरोना संकटामुळे परीक्षा होते नव्हत्या. मात्र, आता होत आहेत तर अडचणी येत आहेत. काल (६ ऑक्टोबर) तांत्रिक गोंधळ झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले आहे. या गोंधळामुळे पेपर पुढे ढकलण्याची मुंबई विद्यापीठावर नामुष्की ओढवली आहे. शेवटच्या वर्षाच्या परीक्षांवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद रंगला आहे.

लागोपाठ दुसऱ्या दिवशी टीवायबीए, टीवायबीकॉमसह आयडॉलच्या म्हणजे दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्ष परीक्षेदरम्यान तांत्रिक गोंधळ झाला. लॉग इन होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षाच देता आली नाही. हेल्पलाईनवर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अखेर कालचे पेपर रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की मुंबई विद्यापीठावर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार- राजेश टोपे

News Desk

औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक

News Desk

पत्रकार संरक्षण कायद्यामुळे पत्रकारांना सत्य मांडण्याचे बळ – .खोतकर

News Desk