HW News Marathi
महाराष्ट्र

उरणमध्ये ‘ओएनजीसी’तील प्लांटमधून पुन्हा नाफ्ता गळती

नवी मुंबई | उरण येथील ओएनजीसीच्या प्लांटमधून नाफ्ता गळती झाली आहे. ओएनजीसीच्या एपीयु युनिटमधून आज (२५ सप्टेंबर) सकाळी सात वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा वायुगळती झाली आहे. ओव्हरफ्लो झालेल्या टाकीतून ज्वालाग्राही नाफ्ता थेट नाल्यातून पीरवाडी समुद्रापर्यंत पोहचला होता. नाल्यात फोमचा वापर करून आग लागणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

या घटनेची माहिती मिळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या वायुगळती नियंत्रणात आली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, पुन्हा एकदा वायुगळती झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाययोजना म्हणून ओएनजीसीच्या अप्पू गेटपासून समुद्राच्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या विकासासाठी आता डबल इंजिन! – मुख्यमंत्री

Aprna

“आता कळले ठाकरे सरकारमधील काही मंत्री…”, नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk

पुण्यात होर्डिंग कोसळून दोघांचा मृत्यू, नऊ जण जखमी

Gauri Tilekar