HW News Marathi
महाराष्ट्र

“हे तर माध्यमांनीच वाढवून सांगितलं!”, पटोलेंचा ‘त्या’ वक्तव्यावरुन थेट माध्यमांवरच आरोप

मुंबई | काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या चर्चेत आहेत. महाविकासआघाडीमध्ये सुरु असलेल्या कुरघोड्यांबद्दल त्यांच्या वक्त्यव्यातून स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सततच्या टीकांमुळे ते सध्या चर्चेत आहेत आणि अनेक राजिक्य चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या विधानावरून विरोधकांच्या टीकेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून देखील तीव्र नाराजी व्यक्त झाल्यानंतर आता नाना पटोलेंनी आपल्या त्या विधानावर सारवासारव करत खुलासा केला आहे. माझं ते विधान माध्यमांनीच वाढवून सांगितलं, अशा गोष्टी होत असतात असा खुलासा नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होण्याची शक्यता आहे.

माध्यमांनी चढवून सांगितलं

नाना पटोलेंनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वादगॅस्त्र आरोपांमुळे राजिक्य वातावरणात खळबळ माजली आहे. मात्र, आता माध्यमांनी हे सगळं चढवून सांगितल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. “केंद्र सरकारने देशाला लुटायचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला काँग्रेसकडून विरोध केला जाणार आहे. केंद्र सरकार रोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवत आहे. चीनचं सैन्य देशात घुसलंय त्याबाबत देखील भाजपा काही उत्तर देत नाहीये. या सगळ्या विषयांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात काँग्रेस नेत्यांमध्ये गोंधळ आहे अस माध्यमांच्या माध्यमातून कुणी पेरतंय. ते चुकीचं आहे”, असं ते म्हणाले आहेत.

दरेकर यांची पटोलेंवर टीका

पटोले यांच्या वक्तव्याचे पडसाद सगळीकडे दिसू लागले. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “नाना पटोलेंनी एकदाच नाही, तर अनेक वेळा तलवार म्यान केली आहे. रोज मरे, त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झाली आहे. ते येतात जोरात. कदाचित त्यांच्या भावना खऱ्या असतील. त्यामुळे त्यांनी त्या ताकदीने मांडल्या. पण नंतर अजित पवारांची नाराजी आणि मुख्यमंत्र्यांनी दट्ट्या दिला असणार”.

काय म्हणाले नाना पटोले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. “सोनिया गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं सांगितलं आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले. “महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे,” असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या गळतीच्या प्रमाणात वाढ

News Desk

‘त्या’ आत्महत्येसाठी स्वतःला अटक कराल का? निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल…

News Desk

मराठा आरक्षण सुनावणीच्या पूर्वतयारीचा मंत्रीमंडळ उपसमितीने घेतला आढावा

News Desk