HW News Marathi
महाराष्ट्र

नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही, म्हणजे नाही | राज ठाकरे

मुंबई | ‘नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही, राज्य सरकारला काय करायचे ते करावे,’ असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सरकारला सांगितले. मुलुंडमध्ये मनसेच्या वतीने १०० महिलांना रोजगाराचे साधन म्हणून रिक्षाचे वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पवरुन सरकारवर निशाणा साधला.

नाणार वासियांनी हा प्रकल्प होऊ नये म्हणून राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. हा प्रकल्प कोकणात होऊ नये म्हणून ग्रामस्थ सर्व राजकीय नेते मंडळींची भेट घेत आहेत. काही दिवसापूर्वी ‘नाणार प्रकल्प महाराष्ट्रातून जावा असे वाटत नाही,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते.

‘स्थानिकांचा विरोध डावलून नाणार प्रकल्प शिवसेना कदापि होऊ देणार नाही,’ असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी परदेशी कंपन्यांसोबत दिल्लीत सामंज्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका”, आशिष शेलारांचा सरकारला इशारा

News Desk

निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी ‘सीबा’ करार मैलाचा दगड ठरेल! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

पुन्हा एकदा भाजपचेच सरकार येणार, फडणवीसांचा विश्वास

News Desk
देश / विदेश

कठुआ बलात्कार व हत्या प्रकरणी आज सुनावणी

News Desk

श्रीनगर | जम्मू कश्मीरच्या कठुआ येथे १० जानेवारी रोजी झालेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व अत्याचार प्रकरणी सोमवार १६ एप्रिल रोजी स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ८ ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या बलात्कार प्रकरणाची सुप्रिम कोर्टाने दखल घेतल्यानंतर पिडीतेचे वडीलांना धमकावण्यात येत असल्याचे बोलले जात होते.

पीडीतेच्या बाजूने बाजूने केस लढणा-या दीपिका सिंह राजावर यांना आरोपींच्या समर्थकांनी धमकावले होते. त्यामुळेच या प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या राज्यात व्हावी अशी याचिका ते सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहेत.या प्रकरणातील मारेक-यांना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये अनेक ठिकाणे आंदोलने सुरू आहेत. तर दुस-या बाजूला आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने सुरु आहेत. आरोपींवर बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारावर अनेक कलम लावण्यात आली आहेत.

Related posts

‘चांद्रयान-२’ने पार केला महत्त्वाचा टप्पा, भारताची चंद्राच्या दिशेने आगेकूच सुरू

News Desk

राहुल यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्याला मसूद अझहर ‘जी’ म्हणाले

News Desk

३० डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांबद्दल जर कोणताही तोडगा निघाला नाही तर… शरद पवारांचा इशारा

News Desk