HW News Marathi
महाराष्ट्र

‘एकनाथ शिंदेंना आमच्यात घेऊ, ते सही पुरते आहेत’, नारायण राणेंचा मोठं वक्तव्य

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनयात्रा सुरु आहे. नारायण राणे वेळोवेळी शिवसेनेवर वर करत आहेत. यावेळी त्यांनी नेते एकनाथ शिंदे यांच्याविषयी वक्तव्य केलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री आहेत. ते शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत

नारायण राणे सध्या जनाशीर्वाद यात्रेवर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, “एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू”, असा दावाही त्यांनी केला.

माझ्यावर टीका केली की मंत्रिपद मिळतं

शिवसेनेच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या वर राणेंनी टीका केली आहे. नीलम गोऱ्हे यांनी नारायण राणेंवर ‘ हे तर दूतींडी साप’ अशी टीका केली आहे. नारायण राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेत आणलं आहे. माझ्यावर टीका केली की मंत्रिपद मिळतं, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबई असो वा वसई-विरार. आमच्या हाती सत्ता द्या”. आम्ही विकास करून दाखवू, असंही ते म्हणाले आहेत.

देशातील 80 टक्के उद्योग माझ्याखात्याकडे

निर्यात केली तर दरडोई उत्पन्नही वाढेल. आर्थिक समृद्धीकडे देश वाटचाल करेल. अमेरिका आणि चीन प्रमाणे महासत्ता बनू. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम आणि कार्य पाहून अभिमान वाटतो. त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री आहे. हे माझं भाग्य आहे. देशातील 80 टक्के उद्योग माझ्याखात्याकडे आहेत. तरुण-तरुणींना उद्योजक बनवण्याचं काम माझ्याकडे आहे. बेकारी कमी करावी, गरीबी कमी करावी यासाठी तरुणांनी लघू आणि सुक्ष्म उद्योग सुरू करावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

नको ते उद्योग करण्यापेक्षा हवे ते व्यवसाय करा

नारायण राणेंनी शिवसेनेला चांगलंच धारेवर धरलं आहे. राज्यात 3 लाख कामगार आज बेकार झाले आहेत. गोमूत्र शिंपडणाऱ्यांना हे माहीत नाही. ते शिंपडत राहण्यापेक्षा व्यवसाय करा. नोकऱ्या द्या. नको ते उद्योग करण्यापेक्षा हवे ते व्यवसाय करा, असा टोला त्यांनी शिवसैनिकांना लगावला आहे.

वसई-विरारमध्ये इमारती झाल्या. पण बेकारी कायम आहे. आजूबाजूला इमारती झाल्या. पण विकास झाला नाही. मुंबईला जायला रस्ते नाहीत. लसीसाठी स्वत: राज्यसरकारचा बजेट आहे. त्यांनी आपल्या लोकांसाठी लस खरेदी करावी, पण टक्केवारी घेऊ नये, असा टोला लगावतानाच राज्याचा मुख्यमंत्री बदलाला तरी राज्याचा विकास होतो, असं ते म्हणाले आहेत.

दुतोंडी सापासारखे ह्यांचे वर्तन

नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या समाधीला वंदन करून नंतर उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाष्य केले आहे. एका बाजूला बाळासाहेबांप्रति आदर व्यक्त करायचा आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी राज्याची सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिले होते, त्या उद्धव ठाकरेंविषयी सातत्याने गरळ ओकायची म्हणजे दुतोंडी सापासारखे ह्यांचे वर्तन आहे, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी राणेंवर टीका केली आहे.

राणेंना मीडिया प्रसिद्धी देत नाही म्हणून ते रोज बोलतात

देवेंद्र फडणवीस यांनी राणेंचे समर्थन केले ही त्यांची मजबुरी आहे. ते नारायण राणे यांच्यामागे फरफटत जात आहेत. ह्या फरफटत जाण्याचा अर्थ काही दिवसांत त्यांच्या लक्षात येईल. आमच्यावर बोलत राहिल्याशिवाय नारायण राणेंना मीडिया प्रसिद्धी देत नाही म्हणून ते रोज बोलतात, असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अपहरण केलेल्या 12 वर्षीय मुलीची पुणे पोलिसांनी केली सुखरूप सुटका

News Desk

आमदार प्रताप सरनाईकांच्या शोधासाठी लोणावळ्यातील रिसॉर्टवर ED-CBIची धाड

News Desk

शिवसेना काँग्रेससोबत गेली तर ती बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची प्रतारणा होईल !

News Desk