HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभाध्यक्षांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळला

मुंबई | राज्याच्या अर्थसंल्पीय अधिवेशनाचा आज (२६ फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. आज स्वातंत्रवीर सावरकर यांचा पुण्यतिथीच्या निमित्ताने आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे सर्व आमदार विधानसभेत सावरकरांचा गौरव करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळून लावला आहे. यानंतर सभागृहात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात सुरू केल्या. यावेळी विरोधकांनी बॅनर घेऊन वेलमध्ये ठाकरे सरकारविरोधात घोषणा करण्यास सुरुवात केली.

केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ का दिले गेले नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना केला. सावरकरांच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांना नेमका काय स्वार्थ साधायचा आहे, हेच कळत नाही, असा टोलाही अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला. तसचे सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या, तुमच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही स्वत: मांडू, असे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विरोधकांना टोला लगावला

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जीएसटी’ कर प्रणालीबाबत नांदेडमध्ये जागरुकता चर्चासत्र

News Desk

नारायण राणे राज्यसभेवर तर मुले आमदार?

News Desk

उदयनराजेंविरुद्ध केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी भिडे आता प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आंदोलन करणार का?

News Desk