HW News Marathi
महाराष्ट्र

गडचिरोलीत भूसुरुंगाच्या स्फोटात १५ जवान शहीद झाल्याची भीती

गडचिरोली | राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात १५ जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे.

नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने पोलीस पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. सी-६० पथकाच्या जवान यात हल्ल्यात शहीद झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून त्यांनी या हल्ल्यात १५ जवान आणि गाडीचा चालक शहीद झाल्याची भीती व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात ३.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, परिसरात भीतीचे वातावरण

News Desk

अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद अपघाताने ! ‘रोखठोक’मधून बोचरी टीका

News Desk

संभाजीराजेंची खासदार निधीतून पूरग्रस्तांना ५ कोटींची मदत

News Desk