HW News Marathi
महाराष्ट्र

‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा !

मुंबई | जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात १६ जवान शहीद झाले आहे. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर माजी संरक्षणमंत्री आणि खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. तसेच, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांच्या या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली असून व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही पवारांनी ट्वीट करत म्हणाले आहे.

नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सी-६० पथकाचे १६ जवान शहीद झाले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी डीजीपी आणि गडचिरोली एसपींच्या संपर्कात असल्याचे ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यंत्र्यांच्या या वक्तव्याचा शरद पवारांनी खरपूर समाचार घेतला आहे. “गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही.” असे ट्वीट त्यांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बी.ए.पी.एस. स्वामीनारायण सांप्रदायामुळे भारतीयांच्या विचार आणि संस्कृतीला लाभला वैश्विक आयाम! – मुख्यमंत्री

Aprna

यशोमती ठाकूरांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता, खिसे गरम करण्यासाठी…चित्रा वाघ यांची टिका !

News Desk

ईडी कडून ज्यांना नोटीस गेली ते अनिल परब नेमके कोण आहेत?

News Desk