HW News Marathi
महाराष्ट्र

पत्रकारितेच्या नावाखाली अजेंडा रेटणाऱ्या ‘अभिनेत्यावर’ कारवाई होताच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं, रोहित पवारांचा सवाल

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना आज (४ नोव्हेंबर) रायगड पोलिसांनी ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई करण्यात आली. यावर भाजपने आक्रमक भूमिका घेत महविकासाघाडी सरकारवर टीका करणे सुरू केलं आहे. ही कारवाई पाहून आणीबाणीच्या काळाची आठवण होत असल्याचे, भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले. भाजप नेत्यांनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.

“पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या ‘अभिनेत्यावर’ कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं. असं म्हणत, ”पण याच ‘अभिनेत्या’मुळं एका सामान्य व्यक्तीने आपल्या आईसह आत्महत्या केल्याचा आरोप, ‘सोशल मीडिया हब’सारख्या यंत्रणेमार्फत लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा मध्यंतरी केंद्राने केलेला प्रयत्न/पत्रकारांचा हक्क हिरावणारा कायदा करण्याचा केलेला प्रयत्न मात्र त्यांना दिसत नाही. हा कसला दुटप्पीपणा?” असे देखील आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.

 

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अटकेच्या कारवाईचा विरोध करत ट्विट केलं आहे. “आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी! – मुख्यमंत्री

Aprna

पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण?, नवज्योतसिंग सिद्धूंसह 4 नावांची चर्चा!

News Desk

“नारायण राणे नारळासारखे आहेत”- चंद्रकांत पाटील

News Desk