HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांनी आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले,राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

मुंबई | राज्यात सध्या मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी, मनसुख हिरेन मृत्यू आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाचे गंभीर पडसाद उमटत आहेत. वाझे प्रकरणावरून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून होत असलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी अधिकारी नेमून मंत्र्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, भाजपने महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलं आहे.

राष्ट्रवादीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की “देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलिस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलिस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत”. असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या सचिन वाझे प्रकरणा संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (१९ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. बराच वेळ पवार व देशमुखांमध्ये चर्चा झाली. बैठक संपल्यानंतर देशमुख यांनी चर्चेबाबत प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना माहिती दिली.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले की मुंबईतील घडामोडींविषयी शरद पवार यांना माहिती दिली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके व मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एनआयए व एटीएस करत आहे. राज्य सरकारकडून त्यांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. तपासामध्ये जे दोषी आहेत, त्यांची नावे यायला हवीत. एनआयएच्या अंतिम चौकशी अहवालानतर पुढील कारवाई केली जाईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागणीसह इतर मुद्यांवर बोलण्यास देशमुख यांनी नकार दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं 

News Desk

पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी राम कदम पुढे आले

News Desk

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १०वी-१२वी परीक्षेदरम्यान वर्गात कमीत कमी विद्यार्थी बसवण्याचा निर्णय

swarit