HW News Marathi
Covid-19

आता २ तासांत उरका लग्न ! ठाकरे सरकारची नवी कडक नियमावली

मुंबई | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अखेर ब्रेक द चेनच्या अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली आहे. सरकारने कडक नियम लागू केले आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांकडून त्याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार सरकारी, खासगी कार्यालये, सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतूक यासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे आता लग्नासाठी लोकांच्या संख्येची नाही तर वेळेचीही मर्यादा लागू केली आहे. आता केवळ २ तासचं लग्नासाठी देण्यात आले असून केवळ २५ लोकांचं परवानगी देण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास थोडाथोडका नाही तर तब्बल ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

यापूर्वी लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती १०० वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकच नाही तर अवघ्या २ तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावा लागणार आहे. या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; आरोग्यमंत्र्यांची माहिती

Aprna

पडळकरांची टीका अन् फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा, रुपाली चाकणकरांनी केंद्राला डिवचलं

News Desk