HW News Marathi
Covid-19

साताऱ्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू

मुंबई | राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांत लॉकडाऊन केला आहे तरी काही जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी केली आहे. महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात आता संचारबंदी लागू केली आहे. साताऱ्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

‘लग्न समारंभात लोकांच्या उपस्थीतीची संख्या दिली आहे, जी मर्यादा दिली आहे त्याचे उल्लघंन केले जात आहे. तसेच, रात्र उशिरापर्यंत हॉटेल्स सुरु असतात त्यावरही काही निर्बंध लावले आहेत. आता हॉटेल्स रात्री ११ पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, या संचारबंदीतून हायवेला वगळण्यात आले आहे. तसेच, विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले आहे’. आधीचेच नियम आणखी कडक केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे साताऱ्यातील शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत. तसेच, मधल्या काळात सर्व ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी गस्ती पथक नेमणयात येतील. तसेच, शिक्षकांच्या मदतीनेही मास्क वापरले जात आहेत का, सोशल डिस्टन्स पाळला जात आहे का याचीही तपासणी केली जाईल.धार्मिक कार्यक्रम, लग्न, राजकीय समारंभ या ठिकाणी नियमांचे उल्लघंन होऊ नये यासाठी गस्त पथक तैनात केले जाणार आहे, अशी माहितीही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चाकरमान्यांसाठी खूशखबर ! गणेशोत्सवासाठी काही अटींसह एसटीने कोकणात जाता येणार 

News Desk

आमदारांचा निधी २ कोटीने कमी करा आणि तो कामगारांना द्या,चंद्रकात पाटलांची सरकारकडे मागणी!

News Desk

दिलासादायक बातमी ! बीड जिल्हा झाला कोरोनामुक्त

News Desk