HW News Marathi
देश / विदेश

राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार – निलेश राणे

मुंबई | केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातून विरोध करण्यात आला. शेतकी प्रचंड आक्रमक होताना दिसले. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली खेती बचाओ यात्रा काल (६ ऑक्टोबर) संगरूर जिल्ह्यात पोहोचली आहे. याच यात्रेवर भाजप नेते निलेश राणे यांनी राहूल गांधीवर सडकून टीका केली आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार. कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी प्रदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं. राहुल गांधींच्या ‘शेती वाचवा’ आंदोलनात, सभांमधून शेतकरी मात्र गायब!असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

भवानीगड येथे धान्यबाजारात झालेल्या सभेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कृषि विधेयकाकरून मोदी सरकारवर निशाणा साधला.मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात गरीब, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी एकही धोरण आणले नाही. ती सर्व धोरणे तीन ते चार निवडक मित्रांसाठी (उद्योगपती) बनवण्यात आली, असे त्यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप जाहीर 

News Desk

कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गरोदर महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट

News Desk

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला संशयित …..

Arati More