HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडतील तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज ठरेल!”, निलेश राणेंनी पुन्हा डिवचलं

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत यावरुन भाजप नेते टीका करताना वारंवार दिसतात. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. फडणवीस यांनी ई पास काढला आहे का अशी विचारणा RTI मध्ये केली आहे. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता घराबाहेर पडतील तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज ठरेल, अशी खोचक टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली. उद्धव ठाकरे कधी घराच्याबाहेर पडणार, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले.

कोपरगाव येथील माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय काळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. कोकण दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ई-पास काढला आहे का, असा प्रश्न त्यांनी माहिती अधिकारातंर्गत विचारला होता. हाच धागा पकडत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणण्याची संधी साधली.

देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून निलेश राणे यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

फडणवीसांचा दौरा

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोपरगावचा अचानक दौरा केला होता. या दौऱ्याच्या अनुषंगाने काळे यांनी माहितीच्या अधिकारात राज्याच्या मुख्य सचिवांकडे अर्ज केला आहे. त्यामध्ये फडणवीस यांनी जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी नियमानुसार अर्ज केला आहे का, याची माहिती मागविली आहे. राज्यभर दौरे करणाऱ्या फडणवीस यांच्या दौऱ्यावर प्रथमच अशी हरकत नोंदवण्यात आली आहे.

भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. त्यावेळी कोरोनासंबंधीच्या नियमांचा भंग झाल्याची तक्रार काळे यांनी केली आहे. त्याअनुषंगाने मुख्य सचिवांकडे माहितीच्या अधिकारात त्यांनी अर्ज केला आहे. कोपरगावमधील या कार्यक्रमास येण्यासाठी फडणवीस यांनी जिल्हा बदलासाठी आवश्यक असणारा ई-पास काढला होता का?

१० पेक्षा जास्त लोकांची गर्दी करण्यास मनाई आहे, असे असताना फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी एवढे लोक एकत्र येण्यास परवानगी दिली होती का? यासंबंधी पोलीस, तालुका किंवा जिल्हा प्रशासनाने कारवाई केली असल्यास त्याचा तपशील मिळावा, अशी माहिती काळे यांनी मागविली असून त्यासोबत कार्यक्रमांचे व्हिडिओ आणि छायाचित्रेही पाठविली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC निवडणुकीपूर्वी २००० कोटींचे प्रस्ताव समितीसमोर आणण्याची योजना; भाजप आमदाराचा आरोप

Aprna

मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी अंतिम सुनावणी

News Desk

‘राज्याच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा’, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार!!

News Desk