HW News Marathi
महाराष्ट्र

‘एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवा’-नितेश राणेंचे महापौरांना पत्र

मुंबई | ‘गेल्या तीस वर्षापासून मुंबईकरांनी शिवसेनेच्या हातात बृहन्मुंबई महानगर पालिकेची एकहाती सत्ता दिली आहे. परंतु या मुंबईकरांच्या विश्वासाची परतफेड आपण कायमच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली. मुंबईकरांच्या हक्काच्या किमान मुलभूत सुविधा तुम्ही पुरवाव्यात ही मुंबईकरांची रास्त अपेक्षा होती. परंतु अनेक मुंबईकरांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात आपला व आपल्या आप्तांचा जीव गमवावा लागला आहे. आज मुंबईकर वैतागुन म्हणतोय एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा.’ अशी टीका महापौर किशोरी पेडणेकर यांना लिहलेल्या पत्रात आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कॉट्रॅक्टरच्या संगनमताने सत्ताधारी सेनेकडून दबाव टाकला जातोय की काय?

‘महानगर पालिकेतील सत्ताधारी सेना जर कॉट्रॅक्टरधाजणे निर्णय घेत असेल व आम्ही विचारलेल्या प्रश्नांना दाद देत नसेल तर लोकशाहीने मार्गाने आयुक्तांना भेटण्याचा पुर्ण अधिकार आहे. परंतु महापालिका आयुक्तही माझ्या युवा मोर्च्याच्या सहकाऱ्यांना भेटण्याचे टाळत आहेत. याचा अर्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कॉट्रॅक्टरच्या संगनमताने सत्ताधारी सेनेकडून दबाव टाकला जातोय की काय? किंवा त्यामुळेच भाजप युवा मोर्चाचे निवेदन स्वीकारण्याची महापालिका आयुक्तांना भिती वाटतेय?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काही प्रमुख मुद्यांवर लक्ष केंद्रीत केले तर १५ दिवसांत परिणाम दिसतील, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

News Desk

‘सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस,’ कोयनेच्या विसर्गामुळे कृष्णा नदी पात्राबाहेर, मुश्रीफांची माहिती!

News Desk

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड

Aprna