HW News Marathi
महाराष्ट्र

गणेश चतुर्थीच्या बैठकीला राणे परिवाराला का बोलवलं नाही ?

मुंबई | यंदाच्या गणेशत्सवाला चाकरमान्यांना कोकणात प्रवास देण्यासंबंधी आणि प्रवासाची मुभा देण्याबाबत मंत्रालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीत आमदार, खासदारांची बैठक झाली. या बैठकीचे नेतृत्व परिवहन मंत्री अनिल परब करत होते. मात्र, या बैठकीला राणे घरातील एकाही सदस्याला बोलावण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले. यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी अनिल परब यांना प्रश्न विचारला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी बोलवलेली ही बैठक केवळ शिवसेनेची आहे का? या बैठकीचे आमंत्रण नाही आणि याची आम्हाला माहितीही दिली नाही. असे नियोजन करून कोणाचा फायदा होणार आहे? आणि कोकणाचे अजुन किती नुकसान हे सरकार करणार आहे? असा प्रश्न अनिल परब यांनी नितेश राणे यांनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मनसे-भाजप युतीवर उगाच पतंग उडवण्यात अर्थ नाही’, विनोद तावडेंचं वक्तव्य

News Desk

“मराठा आरक्षणाचा खरा ‘टक्का’ कोण सांगेल आणि देईल?”, पंकजा मुंडेंचा सरकारला सवाल

News Desk

पेगॅसस प्रकरणात केंद्राची लपवाछपवी, मायबाप सरकार खरं बोला, पेगॅसस वापरले की नाही?

News Desk