HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारने मराठा आरक्षणचा नियोजित पद्धतीने खून केला आहे!

मुंबई | राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने आज (५ मे) रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला आहे. या निकालावर भाजपकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनीा सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

काय म्हणाले नितेश राणे?

या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीने खुन केला आहे. सरकार आल्यापासून ही रोवून केलेली हत्या आहे. कसली तयारी नाही…फक्त नाटक आणि ढोंगीपणा.. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे…तोंड वाजवून न्याय भेटत नसेल…तर तोंड वाजवून न्याय मिळवा…!, नितेश राणेंनी परखड शब्दांत सरकारला सुनावले आहे.

 

अतुल भातखळकर काय म्हणाले?

ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांना मराठा समाजाला न्याय दिला नाही. त्यांना मराठा आरक्षणाच्या विषयाचे फक्त राजकारण करायचे आहे. त्यामुळेच हा विषय कोर्टात टिकला नाही. मराठा समाजावर घनघोर अन्याय झाला, असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करणार !

News Desk

राज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका ही सदनाच्या प्रतिष्ठेची व त्या पदाचे प्रचंड अवमूल्यन करणारी आहे

News Desk

“जरंडेश्वरला किती कर्ज दिलं? EDची नोटीस का आली?” सातारा जिल्हा बँकेने दिली उत्तरे

News Desk