HW News Marathi
महाराष्ट्र

आमचे सरकार स्थिर आहे, ज्यांना पाडून दाखवायचे आहे त्यांनी पाडून दाखवावे – नितीन राऊत

मुंबई | विरोधी पक्ष असलेल्या भाजपने वारंवार हे सरकार पडेल असे म्हटले आहे. मात्र, आघाडीतील नेत्यांनी आमचे सरकार भक्कम आहे असा विश्वास दाखवला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनीही भाजपला आमचे सरकार पाडून दाखवा असे आवाहन केले आहे. “आमचे सरकार स्थिर आहे. ते पाच वर्ष पूर्ण करेल. आम्ही तिन्ही पक्ष कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून एकत्र आलो आहोत. त्यामुळे भाजपने हे सरकार पाडून दाखवावं,” असं आव्हान नितीन राऊतांनी केले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळ्यांशी संवाद साधत आहे. हे सरकार पूर्णवेळ चालेल. आमच्यात कोणतीही नाराज नाही. कोणाचीही मानहानी होत नाही. आमचे सरकार स्थिर असून ते पाच वर्ष पूर्ण करेल. ज्यांना कोणाला हे सरकार पाडायचं असेल त्यांनी पाडून दाखवावं,” असं आव्हान नितीन राऊत यांनी केले.

“महावितरण ही एक कंपनी आहे. कोरोनामुळे लोकांवर संकट आलं आहे. वर्क फॉर्म होम किंवा लॉकडाऊनमुळे घरी विजेचा वापर जास्त झाला हे नाकारता येत नाही. तीन महिने बिल जास्त आले, असा अनेक लोकांचा आरोप आहे. मात्र जे सरासरी बिल असतं तेच दिलेले आहे,” असे वाढीव वीज बिलासंदर्भातही नितीन राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे..

“वीजबिलासंदर्भात भाजप जे आंदोलन करत ते चुकीचे आहे. केंद्र सरकार जी मदत देणार होतं. ती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करावे,” असे नितीन राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट

Aprna

‘अखेर संजय राठोड समोर आले’, म्हणाले…

News Desk

पुन्हा रेल्वे अपघात; दुरांतो एक्स्प्रेसचे ९ डब्बे घसरले

News Desk