HW News Marathi
देश / विदेश

लॉकडाऊनमध्ये कोणतीही विशेष ट्रेन चालवण्यात येणार नाही, रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

मुंबई | कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधीत वाढ केली आहे. यामुळे देशातील रेल्वे ३ मेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भात मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देशातील रेल्वे सेवा ३ मेपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे. यात ट्वीटमध्ये रेल्वे मंत्रालयाने सांगितले, ज्या लोकांनी रेल्वेचे तिकिट बुक केले आहे. त्या सर्वांचे बुकिंग रद्द केले जाणार असून रेल्वेकडून अडकलेल्या मंजूरांसाठी कोणतीही विशेष ट्रेन चालविण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊन वाढवल्याने १५ एप्रिल ते ३ मेपर्यंतची सर्व तिकीटे रेल्वेला रद्द करावी लागणार आहेत. जवळपास ३९ लाख तिकीटे रद्द करावी लागतील आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद असली तरी मालगाड्यांची वाहतूक मात्र सुरू असणार आहे. अत्यावश्यक सेवा आणि वस्तुंचा नागरिकांना सुरळीत पुरवठा करण्यासाठी मालगाड्यांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून पुढील आदेश येईपर्यंत रेल्वेचे तिकिट बुकींग होणार नाही आणि आधी बुक झालेली तिकीटे रद्द करण्यासाठी ऑनलाइन सुविधा सुरू राहतील, असे रेल्वेने स्पष्ट केले.

दरम्यान, “ट्रेन चालू होणार या प्रकारची अफवा ज्यांनी पसरविली त्याबद्दलचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहे, तसेच चौकशी करून अफवा पसरविणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल,” असे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई-गोवा क्रुझची आज पहिली सफर

Gauri Tilekar

उद्धव ठाकरे विनंती आहे, तुम्ही खुदा होऊ नका !

News Desk

शिंदे गटाला नाव-चिन्हा देण्याचा निर्णय योग्य; निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात पाठविले उत्तर

Aprna