HW News Marathi
Covid-19

यवतमाळमधील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा तासागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर यवतमाळमधील देखील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी वाढ झाली असून येथील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा आता ४० वर पोहोचला आहे. यवतमाळमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलेल्या १५ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आलेले हे सर्व रुग्ण एकाच कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले असल्याची माहिती मिळत असून हे सर्वजण तीन कुटुंबातील सदस्य आहेत.

यवतमाळमध्ये जरी आतापर्यंत एकूण ४० कोरोनाबाधितांची नोंद झाली असली तरीही या ४० पैकी १० जण हे कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी गेले आहेत. त्यामुळे सद्यस्थिती उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३० इतका आहे. यवतमाळ शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी यवतमाळ शहर २४ एप्रिल दुपारी १२ वाजल्यापासून २७ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत गुरुवारी (२३ एप्रिल) हा निर्णय घेण्यात आला आल्याची माहिती मिळते.

यवतमाळ शहरातील या बंद दरम्यान सर्व अत्यावश्यक सेवा त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी पेट्रोल पंप २४ तास सुरु राहतील. तर दुकाने सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ६ ते ८ इतक्या वेळेसाठी सुरु राहतील. पशु वैद्यकीय दवाखाने देखील या बंद दरम्यान सुरूच राहणार असून पशुखाद्याची दुकाने देखील सकाळी ६ ते ९ या वेळात सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत बायोटेकच्या Covaxinला २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीस परवानगी

News Desk

राज्यातील कडक निर्बंध आणखी १५ दिवसांसाठी वाढले

News Desk

देशात गेल्या २४ तासांत २ हजारहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू

News Desk