HW News Marathi
महाराष्ट्र

विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारने शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला !

कोल्हापूर | “विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारने शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला,” अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, “आघाडी सरकारने विधानसभा अधिवेशनात केवळ औपचारिकता केली. सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसा दिला नाही. विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारने शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला.”

“कर्जमाफी हा त्यांचा दुसरा यूटर्न आहे. संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा, २५ हजार रुपये हेक्टरी मदत अशा अनेक घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्या होत्या. मात्र, आता त्यांनी ती आश्वासने पाळली नाहीत. जे कर्ज सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असेल तेच माफ होणार आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा कोणताही फायदा होणार नाही,” असेही फडणवीसांनी सांगितले. कोल्हापुरात आलेल्या फडणवीसांनी आज (२३ डिसेंबर) पत्रकारांशी संवाद साधताना महविकसाआघाडी आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. माजी खासदार धनंजय महाडिक यांचे सांगली जिल्ह्यातील चुलत बंधू स्वरूप आणि राहुल महाडिक यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

मी पाहिलेले उद्धव ठाकरे ते नाहीत | फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी शिवसेनेला असा प्रश्न विचारला की काँग्रेस राष्ट्रवादीच्या जीवावर मी महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आणेल असा, शब्द उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिला होता का?, असा तर शब्द त्यांनी दिलाच नसेल. असा शब्द बाळासाहेबांनी कधी ऐकूनही घेतला नसता. ते म्हणाले सत्तास्थापनेसाठी मी कुठल्याही थराला जायला तयार आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी पाहिलेले उद्धव ठाकरे ते नाहीत.” यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, महेश जाधव, राहूल चिकोडे, विजय जाधव उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारच्या दडपशाहीचा विद्यार्थी संघटनेकडून निषेध

News Desk

मुंबईत निर्भया प्रकरणाची उजळणी!

News Desk

मुंबईतील गोवंडीत इमारतीचा भाग कोसळला, ३ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी

News Desk