HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, फडणवीसांचा आरोप

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा (२५ फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, “शेतकऱ्यांचा सात बारा कोरा कधी करणार, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत कधी मिळणार,” असा सवाल फडणवीसांनी सरकारला विचारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र काल जाहीर झालेल्या यादीत बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपच्या सर्व आमदारांचे विधीमंडळबाहेर आणि सभागृहात शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्यावर घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यामुळे सभागृहाचे कामकाज विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी तव्बल अर्धा तास विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर पटोलेंनी स्थगन प्रस्तावाला मान्यता देत १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश मेहतांची उचलबांगडी, पालकमंत्री पदावरून हटवले

swarit

राज्यात खासगी बसमधून १०० % प्रवासी आणि पर्यटक वाहतुकीला संमती

News Desk

ओबीसी शिष्यवृत्ती बाबतचा मार्चमधील निर्णय ऑगस्टमध्ये रद्द करणे अन्यायकारक – छगन भुजबळ

Manasi Devkar