HW News Marathi
Covid-19

ठाकरे सरकारने एक दमडीचेही पॅकेज दिले नाही, अंग चोरुन काम करते !

मुंबई | केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केले, पण राज्य सरकारने एक दमडीचेही पॅकेज दिले नाही, राज्य सरकार अंग चोरुन काम करते आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर केली आहे. देशातील कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड यांनी त्यांच्या राज्यांसाठी पॅकेज दिले. मात्र, महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही. केंद्र सरकारने राज्याला ४६८ कोटी दिले, याशिवाय १६०० कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले, असा आरोपही फडणवीसांनी सरकारवर केली आहे.

कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यास राज्य सरकार अपयश ठरल्यामुळे भाजपने त्यांच्याविरोधात आज (२२ मे) “मेरा आंगण, मेरा रणांगण” असे म्हणत महाराष्ट्र बचावचा नारा देत आंदोलन पार पडले. या आंदोलनानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून सरकारवर हल्लाबोल केला.

या पिकांची खरेदी होते त्याचे पैसे केंद्र देते, पण राज्याने ती खरेदी करायची असते. पण, ते कामही राज्य सरकार करत नाहीय, केंद्राने राज्याला पैसेही दिले आहेत. आता खरिपाचा हंगाम आहे, शेतकऱ्यांना जी मदत हवी. त्याबद्दल राज्य सराकरने अद्याप काही पावले उचलली नाहीत, मजूर, बारा बलुतेदार संकटात आहेत, त्यांना कोणतीही मदत राज्य सरकारने केलेली नाही.

सर्व गरिबांसाठी ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज द्याव

असंघटीत कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय, त्यांच्याबाबत निर्णय घ्यायला हवा, कोरोनाचे उपचार मोफत व्हायला हवेत. खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन सर्वांवर मोफत उपचार व्हावे. शेतकरी, असंघटित कामगार, रिक्षाचालक, मजूर, बारा बलुतेदार अशाप्रकारच्या सर्व गरिबांसाठी ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज द्याव, अशी माहिती भाजपने केली आहे.

खासगी रुग्णालयात सामान्यांना उपचार घेणे परवडत नाही | फडणवीस

खासगी रुग्णालयात सामान्यांना उपचार घेणे परवडत नाही, देशात कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण ४ टक्के, महाराष्ट्रात १२.५ तर मुंबईत १३.५ टक्के आहे. सर्व महानगरात कोरोनाचा कहर, मात्र राज्य सरकारची तयारी नाही, बीकसीला सेंटर उभे केले.पण ते दोन दिवसात भरुन जाईल आणि पाऊस पडला तर या सेंटरचे काय होईल? सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाही, असा सवालही फडणवीसांनी सरकारला विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना संपल्याशिवाय मुंबईची लोकल सुरु होणार नाही!

News Desk

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण आढळला नाही!

News Desk

एक कोरोना रूग्ण सापडला तर बाजूची २० घरं सिल करणार,’या’ राज्याचा निर्णय!

News Desk