HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश !

मुंबई | महाराष्ट्र राज्यात वेगाने वाढत असलेल्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदीचे आदेश (कलम १४४) लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येता येणार नाही. तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार १५ मार्चपासून सर्वप्रकारच्या पर्यटन आणि बिझनेस टूर बंद करण्यात आल्या आहे.शासनाचा हा आदेश न पाळणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाईल.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ झाली आहे.मुंबई ,पुणे ,नागपूर,यवतमाळ,औरंगाबाद या शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणुन राज्यशासनाने शाळा-काॅलेज,मॅाल्स,थिएटर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदादेखील लागू करण्यात आला आहे. मुंबई आणि पुणे शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभुमिवर शासनानकडून मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.


Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तब्बल तीन महिन्यानंतर झी मराठीच्या ‘या’ मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात

News Desk

मुख्यमंत्री एक नंबर काम करत आहेत – अस्लम शेख

News Desk

कोरोना रुग्णाला आता नातेवाइकांना भेटण्याची परवानगी – राजेश टोपे

News Desk