HW News Marathi
महाराष्ट्र

आंदोलनामधील आत्महत्या थांबवण्याची जबाबदारी आयोजकांचीच | उच्च न्यायालय

औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर अनेक मूक मोर्चे निघाले, आंदोलन करण्यात आली. ही आंदोलने अतिशय संघटनात्मक पातळीवर आयोजिली जातात आणि या आंदोलनामध्ये आत्महत्या देखील झाल्या आहेत. हे सर्व रोखण्याची जबाबदारी आता आयोजकांनी असणार आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, आत्महत्येसारखे प्रकार होऊ नयेत यासाठी जगजागृती करणे हे आयोजकांचेच कर्तव्य आहे, असे मत नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी म्हटले आहे.

याचसोबत या औरंगाबाद खंडपीठाने ‘शासनाने या संदर्भात धोरणात्मक भूमिका घ्यावी’, अशी मागणी करणारी जनहित याचिका नामंजूर केली आहे. ही याचिका सामाजिक कार्यकर्ते सचिन सुभाष सोळुंके यांनी दाखल केली होती. याचिकेमध्ये विभागीय आयुक्त आणि गृहविभागाचे प्रधान सचिव यांना प्रतिवादी केले आहे. याचिकाकर्ते स्वतः मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात सक्रिय सहभागी आहेत. या आंदोलनात ५८ मोर्चे अतिशय शांततेने आणि सनदशीर मार्गाने काढण्यात आले. मात्र हा विषय अजूनही सुटलेला नसल्याने यातील काही तरुणांनी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केल्या.

या आंदोलनादरम्यान झालेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन आणि सहभागी सर्वच गटांतील नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी केंद्राची आवश्‍यकता आहे. ते स्थापन करण्याचे निर्देश शासनाला देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवभुमीतून आलेल्या राज्यपालांकडून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र मिळत असेल तर ती काळाची गरज आहे! 

News Desk

भाजपचा राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याचा आग्रह होता हे खरं आहे! – नवाब मलिक

Aprna

आरे मेट्रो कारशेड वाद : पर्यावरणप्रेमींचं मध्यरात्री आंदोलन

News Desk