HW News Marathi
महाराष्ट्र

पालघर मॉब लिंचींग प्रकरणी १५४ जणांना अटक, पुढील कारवाई कोर्टात होणार – गृहमंत्री

मुंबई | पालघरमध्ये २ साधू आणि एका ड्रायव्हरची निर्घृण हत्या झाली होती. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्वाची माहिती दिली आहे. पालघर मॉब लिंचींग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले होते. सीआयडीने या प्रकरणाची चार्जशिट कोर्टात दाखल केली आहे.

यात त्यांनी जो तपास केला आहे या तपासाअंती असे निष्पन्न झाले की ही संपूर्ण घटना मुलांचे अपहरण केले जाते या अफवेमुळे झाली, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. मात्र, काही राजकीय पक्षांनी या घटनेला जातीयवादाचा आणि धर्माचा रंग दिला ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचेही त्यांनी म्हटले. हिंदू- मुस्लिम किंवा हिंदू ख्रिश्चन असा वाद निर्माण करण्याचा जो काही पक्षांनी प्रयत्न केला त्यानंतर तपास केल्यावर केवळ अफवा पसरल्याने ही हत्या झाल्याचे समोर आले आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

या प्रकरणाच्या तपासासाठी साधारण ८०८ जणांना बोलावून त्यांची साक्ष घेतल्याची माहिती देखील त्यांनी दिली. त्यांपैकी १५४ जणांना अटक करण्यात आली आहे. आणि या प्रकरणाची पुढील कारवाई कोर्टात होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

काय होते प्रकरण ?

एप्रिल महिन्याच्या १६ तारखेला पालघरमधील गडचिंचोले गावात महंत कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज या दोन साधूंसह त्यांचा कार चालक नीलेश तेलगडे याची जमावानं लाठ्याकाठ्या आणि दगडानं ठेचून हत्या केली होती. या प्रकरणामुळे देशभरात राजकीय वादळ सुरु झाले होते. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका झाली होती. तसंच, विश्व हिंदू परिषदेने सीआयडी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘१२वीच्या गुणांवरच पदवीचे प्रवेश’, CET परीक्षा होणार नसल्याचं उदय सामंतांचं स्पष्टीकरण!

News Desk

अमृता फडणवीस पुन्हा एकदा सोशल मीडियावर झाल्या ट्रोल, अर्थसंकल्पाच्या ‘त्या’ ट्विटवर नेटकऱ्यांनी केले टार्गेट

News Desk

‘ऐरे गैरे नथु खैरे’, जयदत्त क्षीरसागरांची पुतणे संदीप क्षीरसागरांवर टीका

Aprna