HW News Marathi
देश / विदेश

लखीमपूर हिंसाचारात सिद्धूंना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर मुख्यमंत्र्यांना लखीमपूरमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी नाही

चंदिगड | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमधील हिंसाचारात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. यात ४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या हिंसाचाराविरोधात पंजाबमधील काँग्रेसचे दिग्गज नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आंदोलन केलं. पण चंदिगड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पंजाबमध्ये राज्यपाल भवनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नवज्योत सिंग सिद्धूंच्या नेतृत्वात आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पोस्टर्स झळकावली आणि घोषणाबाजी केली

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना लखीमपूर खीरीत आपले हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी दिली नाही

शेतकऱ्यांना कारने चिरडल्याचा आरोप असलेल्या केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या मुलाला अटक करण्याची मागणी सिद्धूंनी केली. चंदिगड पोलिसांनी सिद्धू आणि काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.दुसरीकडे, उत्तर प्रदेश सरकारने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना लखीमपूर खीरीत आपले हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी दिली नाही. लखीमपूर खीरीतील घटनेनंतर कायदा-सुव्यवस्थेची स्थिती पाहता जिल्ह्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांना जिल्ह्यात येण्याची परवानगी देणं शक्य नाही, असं उत्तर प्रदेशच्या गृहमंत्रालयाने पंजाब सरकारला म्हटलं आहे.

मी मृत शेतकऱ्यांच्या दुःखी कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो. दु:खाच्या या क्षणी मी लखीमपूर खीरीला आपल्या बांधवांना भेटण्यासाठी जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगीही मागितली आहे, असं मुख्यमंत्री चन्नी यांनी आज ट्विट करून सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिल्ली हिंसाचारवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली

swarit

#DelhiViolence : न्यायाधीशांची तडकाफडकी बदली, काँग्रेसची भाजप सरकारवर टीका

swarit

दसरा गेला, आता बळीराजाची दिवाळी तरी गोड करा ! पंकजांनी घेतली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट 

News Desk