HW News Marathi
Covid-19

परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाला असून तो पुढेही कोरोनामुक्तच राहिल -नवाब मलिक

परभणी | कोरोनाबाधित रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने परभणी जिल्हा अखेर कोरोनामुक्त झाला आहे. यासाठी मेहनत घेणार्‍या सर्व यंत्रणांचे अल्पसंख्याक मंत्री आणि परभणी जिल्हयाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आभार मानले.तसेच, यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीचे कौतुकही केले आहे.सुरुवातीपासूनच परभणी जिल्हा कोरोनामुक्त होता.

मात्र, एक कुटुंब पुण्यातून आल्यावर त्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. त्या रुग्णाच्या कुटुंबाला कॉरनटाईन करण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने जिल्हयात खबरदारी घेतली होती.

‘दरम्यान याकामी मेहनत घेणार्‍या यंत्रणेचे विशेषतः जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्य कर्मचारी या सर्वांच्या कामाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी कौतुक केले आहे आणि यापुढेही परभणी जिल्हा कोरोनामुक्तच राहिल असा विश्वासही व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी आज संवाद साधत लॉकडाऊनची घोषणा करणार?

News Desk

देशाच्या अर्थव्यवस्थेला अत्यंत मोठा धक्का, GDP मध्ये ऐतिहासिक घट

News Desk

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी २० हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद

Aprna