HW News Marathi
महाराष्ट्र

गावी चालत जाणाऱ्यांना टोलनाक्यांवर अन्न-पाणी पुरवा, नितिन गडकरींची मागणी

मुंबई | कोरोनाच्या धास्तीने लोकं गावाकडे जायला निघाले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या, बस सगळं काही बंद असल्याने लोकांनी पायीच गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. पायपीट करत गावी जाणाऱ्या मजूर आणि नागरिकांना अन्नपाणी पुरवावे अशी सुचना केंद्रिय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच टोल ऑपरेटर यांना ही सुचना करत त्यांनी ट्विट केले आहे.

२१ दिवसांच्या या लॉकडाऊनमूळे मजूरांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत आहेत.लहान मुलाबाळांसह संपूर्ण कुटुंबंच उन्हात चालत गावी जात आहेत.अनेक अडचणींना सामोर जात त्यांच्या खाण्यापिण्याचे अनेक हाल होत आहेत. त्यामूळे, “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसंच टोल ऑपरेटर्सना सल्ला दिला आहे आहे की, घरी पोहोचण्यासाठी पायपीट करणाऱ्या स्थलांतरित मजूर तसंच नागरिकांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करा. सध्याच्या परिस्थितीत आपण या या बांधवांची मदत केली पाहिजे. मला खात्री आहे की, टोल ऑपरेटर्स या सूचनेला प्रतिसाद देतील, असे ट्विट करत त्यांनी तातडीने त्यांना मदत मिळावी असे आवाहन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पक्षाप्रमाणे खातेवाटप झाले, उद्या किंवा परवा जाहीर करू !

News Desk

गिरीश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवा! – एकनाथ खडसे

Aprna

चक्क विधानपरिषदेत रंगली भडंग, वडा आणि माश्यांची चर्चा…..

Ruchita Chowdhary