HW News Marathi
महाराष्ट्र

मे २०२० पर्यंत राज्य प्लास्टिकमुक्त करण्याचा पालिकेचा प्रयत्न यशस्वी होणार का?

मुंबई | राज्यात सगळीकडे प्रदुषण वाढत आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील कितीतरी गोष्टींमुळे प्रदुषण वाढते. त्यातील महत्त्वाचे म्हणजे प्लास्टिकमुळे होणारे प्रदुषण. प्लास्टिकमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी १ मार्चपासून प्लास्टिकर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. मे २०२० पर्यंत प्लास्टिक बंदी केली असून पालिकेने तीन दिवसांत ४०८१ आस्थापनांना भेट दिली. यामध्ये १०२८ किलो पालिकेने प्लास्टिक जप्त केले आहे. तर, ३ लाख ७५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच, पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक प्लास्टिकचा साठा मशिद बंदर येथे आढळला आहे.

मुंबई महानगरपालिकेने १० वर्षांपुर्वी हाती घेतलेली प्लास्टिक बंदीची कारवाई पुन्बा एकदा सुरु केली आहे. मे २०२० पर्यंत राज्य हे प्लास्टिकमुक्त करण्याचा पण घेत पालिकेने हे काम हाती घेतले आहे. मुंबईतील सर्व ४०८१ आस्थापकांना संबंधित अधिकाऱ्यांनी भेट घेत १०२८.०९७ किलो प्लास्टिक जप्त केले अशून ३ लाख ७५ हजारंचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, दुकाने, फेरीवाले यांनी दंड देण्यास मनाई केली तर त्यांच्यावर कडक कारवाईही पालिकेकडून करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपने एकदा स्वतंत्र लढून बघावे, ६०-६५ जागेवर समाधान मानावे लागेल, जयंत पाटील

News Desk

गंगेच्या किनारी मृतदेहांची विटंबना, महाराष्ट्र मॉडेल लागू करणार का, संजय राऊत गरजले!

News Desk

देश सेवेसाठी लष्करात जाण्याचा दलित तरुणांना सल्ला – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

News Desk