HW News Marathi
देश / विदेश

#CoronaVirus : पंतप्रधानांनी ‘जनता कर्फ्यू’बद्दल मानले आभार, मोठ्या लढाईची सुरुवात !

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी आज जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. त्यानुसार आज (२२ मार्च) सकाळी ७ वाजल्यापासून वाजेपर्यंत देशभरात जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जनता कर्फ्यू थोड्यात वेळात संपण्यापूर्वी मोदींनी ट्वीट करत जनतेला पुन्हा एक नवे आवाहन दिले आहे. मोदींनी ट्वीटमध्ये म्हणाले की, जनता कर्फ्यू आज रात्री ९ वाजता समाप्त होणार आहे. मात्र, याचा अर्थ असा होत नाही. आपण जल्लोष करायला सुरुवात केली पाहिजे. हे यश न मानता, एका मोठ्या लढाईची सुरुवात आहे. आज देशवासियांनी दाखवून दिले की, आपण सक्षम आहोत, आपण दुढ निश्चय केला तर सर्वात मोठ्या संकटला देखील हरवू शकतो.”

मोदी म्हणाले की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे जनतेने पालन करावे. ज्या राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्या राज्यातील जनतेने घरातून बाहेर पडू नका, तर देशातील इतर राज्यात गरज नसल्यास घराबाहेर जाणे टाळा, असे आवाहन केले आहे. कोरोना व्हायरसच्या लढाईत सहभागी होणाऱ्या देशातील प्रत्येक व्यक्तीचे धन्यवाद करत, सर्वांचे आभार मानतो, असे ट्वीट करत मोदींनी आजच्या जनता कर्फ्यूला दिलेल्या उत्तम प्रतिसादबद्दल धन्यवाद करत आभार व्यक्त केले.

महाराष्ट्रात आजमध्य रात्रीपासून १४४ लागू

महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधून केलेल्या लाईव्ह प्रसारणात केली. यादरम्यान, रेल्वे , खाजगी आणि एस. टी. बसेस बंद करण्यात येत आहेत, लोकल सेवाही बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरु राहील. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधी, वीजपुरवठा करणारी केंद्रे सुरुच राहतील, हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्थाही सुरुच राहतील. तसेच शासकीय कार्यालयात आता 25 टक्के उपस्थिती होती. ती आता केवळ 5 टक्के करण्यात येत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज नीरव मोदीच्या जामीनप्रकरणी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात सुनावणी

News Desk

काँग्रेसला मोठा धक्का! राहुल गांधींची खासदारकी रद्द; काय आहे प्रकरण?

Aprna

“काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा ‘चक्काजाम’ झालाय ?”, शेलारांचा बोचरा सवाल

News Desk