HW News Marathi
महाराष्ट्र

बारामतीत होम कॉरंटाईन केलेल्या नागरिकांचा पोलिसांवर हल्ला

बारामती | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीदरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नका, घरात राहा, असे आवाहन सरकारकडून केले जात आहे. तरी देखील नागरिक सरकारच्या नियमाचे पालन न करता घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरात काल (२७ मार्च) दुपारच्या सुमारास जळोची भागात काही नागरिकांनी होम कॉरंटाईन नागरिकांनी मारहाण केल्याची माहिती आहे तर काटेवाडीत देखील पोलिसांना मारण्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यामध्ये बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह तीन अधिकारी आणि सहा कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमध्ये ४ पोलीस अधिकारी,५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.जखमींमध्ये २ महिला पोलीस अधिकाऱ्यांसह एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, बारामती शहरातील जळोची येथील काही नागरिकांनाही आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. तसा शिक्काही या नागरिकांच्या हातावर मारण्यात आला आहे. काल दुपारी हे नागरिक परिसरात फिरत असताना त्यांना स्थानिक तरुणांनी त्यांना बाहेर फिरण्यास मज्जाव केला. होम क्वारंटाईन असताना बाहेर फिरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू नये, अशी विनंती या तरुणांनी केली. यावरून स्थानिक तरुण आणि आणि या होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्यात वादावादी झाली. यात त्यांनी काही युवकांना मारहाण केली. या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही गटातील नागरिकांना समजावून सांगण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. तरीही दोन्ही गटातील तरुण ऐकयला तयार नव्हते. उलट होम क्वारंटाईन असलेल्या गटाने पोलिसांवर हल्ला चढवला.

या प्रकरणी पोलिसांनी ४ लोकांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकारानंतर जळोचीमध्ये राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘कोरोना’ प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारीच (२६ मार्च) दिला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सद्यस्थितीचा आढावा घेऊन अधिक कठोर पावले उचलणार !

swarit

चिपळूणमध्ये पुराची पाणीपातळी चार-पाच फुटांनी खाली

News Desk

“रश्मी शुक्लांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांचे कटकारस्थान”, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप   

News Desk