HW News Marathi
Covid-19

५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घरीच राहण्याचे मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश

मुंबई | लॉकडाऊनमध्ये पोलीस दल आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहे. यावेळी पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पाश्वभूमीवर ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि आजार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ अशी माहिती पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी दिली. या पोलीस कर्मचाऱ्यांना काल (२७ एप्रिल) लॉकडाऊन संपेपर्यंत भरपगारी रजा देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात गेल्या तीन दिवसामध्ये कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर आयुक्तांनी पोलीस ठाण्यांना आदेश दिले. गेल्या तीन दिवसात मुंबई पोलीस दलातील तीन पोलिसांचा बळी गेला होता. कुर्ला ट्रॅफिक विभागात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या हवालदाराचा काल (२७ एप्रिल) कोरोनामुळे मृत्यू झाल होता.

याआधी २६ एप्रिलला ५२ वर्षीय हवालदाराचे निधन झाले, तर २५ एप्रिलला ५७ वर्षीय हवालदारालाही कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. संबंधित कर्मचारी वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता, तर वरळीचा रहिवासी होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी मृत्यू झालेल्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंदिर बंद उघडे बार, उद्धवा अजब तुझे सरकार !, राज्य सरकारविरोधात भाजप आक्रमक  

News Desk

महाराष्ट्राला देशात कोरोनामध्ये एक नंबर वर नेणारा माणूस आमदार झाला

News Desk

“पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि तुम्ही महाराष्ट्राला धमकी देतात?”

News Desk