HW News Marathi
महाराष्ट्र

विनाकारण गाड्या घेऊन बाहेर पडणाऱ्या सांगलीकरांवर पोलिसांची कारवाई

सांगली | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू आणि देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, हे करून राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील मुंबई, पुण्यानंतर आता सांगली कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. सांगलीत २५ कोरोनाग्रस्त असून इस्लामपूरमधील कोरोनाबाधित कुटुंबीयांच्या संपर्कात शहरातील ३३७ नागरिक आल्याची माहिती समोर आली. यामुळे कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात अजून वाढ होऊ नये, म्हणून पोलिसांनी खरबदारीचा उपाय म्हणून सांगली शहरातील रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीवर कडक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांच्या कारवाई अंतर्गत तब्बल चार तासात ३०० गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या सांगली पोलिसांकडून मिळाली आहे.

सांगलीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून तरी देखील नागरिक किराणा माल आणि भाजीपाला खरेदीसाठी विनाकारण दुचारीवरून बाहेर पडणाऱ्या गाड्यांना पोलिसांनी कारवाई करत जप्त केल्या जातील, असा इशारा सांगली शहर पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी दिला होता. तरी देखील नागरीक भाजपीला, किराणा माल आणि औषध घेण्यासाठी दुचाकीवर निणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. मात्र, पोलिसांना नाईलाजाने नागरिकांवर काल (३१ मार्च) सकाळी सात वाजल्यापासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सांगलीतील प्रत्येक चौकात दुचाकी गाडी अडवून कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी चार तासात तब्बल ४०० गाड्या जप्त केल्याची माहिती मिळली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांना राज्य सरकार प्रोत्साहन देणारः सुभाष देसाई

swarit

GST करसंकलनात महाराष्ट्र अव्वल! – अजित पवार

Aprna

भाजप-शिवसेना युतीचा ५०-५० फॉर्म्युला निश्चित !

News Desk