HW News Marathi
महाराष्ट्र

राजकीय नेत्यांनी जनतेला दिला सोशल मीडियावरुन धीर

मुंबई | संपुर्ण देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान मोदींनी आज घोषित केलेल्या जनता कर्फ्यूचे पालन देशभरातून सगळे नागरिक काटकेरपणे करत आहेत. मुंबईची ओळख असणाऱ्या लोकल ट्रेनचा प्रवास हा आता सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक सेवा असणाऱ्यांनाच ओळखपत्र तपासून ट्रेंनमध्ये प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, जनतेने घाबरुन न जाता घरातच बसावे आणि सरकार ज्या सुचना देत आहेत त्यांचे पालन करावे असे आवाहन अनेक नेत्यांनी सोशल मीडियाच्या द्वारे नागरिकांना केले आहे. गेली अनेक दिवस कोरोनाच्या दिवसेंदिवस परिस्थितीवर जे काटेकोरपणे लक्ष देत आहेत असे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पंतप्रधानांनी घोषित केलेल्या जनता कर्फ्यूचे पालन करुयात, घरातच बसूयोत असे ट्विट केले आहेच शिवाय त्यांनी व्हिडिओद्वारेही लोकांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला आहे.

सामाजिक न्याय व विकासमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील कोरोनास्वरुपी संकटाचा संयमाने आणि धीराने सामना करावा असे आवाहन जनतेला केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेला घरी थांबण्याची विनंती केली आहे.

कर्फ्यूमुळे लोकं घरातून बाहेरच पडत नसल्याकारणाने त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधान नरंद्र मोदी यांनी काही गायकांच्या लिंक ट्विटरवरुन जनतेसाठी ट्विट केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…जे राजकारण झाले, ते मला व्यथित करणारे”, बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया

Aprna

“…राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय”, शरद पवारांची मिश्किल टीका

Aprna

भिमाकोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेंना ताब्यात घ्या – आठवले

swarit