HW News Marathi
महाराष्ट्र

विद्युत वाहिनीवर टॉवर पडल्याने वीजपुरवठा खंडित

वाशिम | शिरपूर परिसरात उभारण्यात आलेले पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे पाच टॉवर वादळवा-यामुळे जमीनदोस्त झाले आहे. तसेच महावितरणच्या विद्युत वाहिनीवर हे टॉवर पडल्याने परीसरात वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या वादळ वा-यामुळे हे टॉवर पडले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

वर्धा येथून औरंगाबादकडे हि वीज नेण्यात येत असून, यासाठी पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे वीज वाहिनीचे तार व टॉवर उभारणीचे काम केले जात आहे. शिरपूर परिसरातून वीज वाहिनी गेली असून, अनेकठिकाणी टॉवर उभारणी करण्यात आली आहे. अद्यापही या वाहिनीचे काम पूर्ण न झाल्याने वीजपुरवठा सुरू झालेला नाही. दरम्यान, ८ जूनच्या रात्रीच्या सुमारास वादळवा-यामुळे शिरपूर परिसरातील पाच टॉवर जमीनदोस्त झाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बड्या कार्पोरेटसच्या एनपीएची पुनर्रबांधणीला बँकांचा विरोध, उद्यापासून सर्व बँकांचा संप

News Desk

भाजपच्या बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर, तर ट्विट करत ‘गोपीनाथ गड’चे दिले आमंत्रण

News Desk