HW News Marathi
महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतले पूरग्रस्त ब्रम्हनाळ गाव

सांगली | सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात बचावकार्यादरम्यान एक खाजगी बोट उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे ब्रम्हनाळ गावात पूराचे पाणी शिरल्याने येथील स्थानिकांनी राबविलेल्या बचावकार्यादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आता या पूरग्रस्त गावाला दत्तक घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास ३५०० लोकसंख्या असलेल्या या गावातील ७०० कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेतली आहे.

  • गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी व औषध उपचार करणार

  • 700 कुटुंबाना पुढील एक महिना पुरेल एवढी राशन धान्याची व्यवस्था करणार
  • गावातील विदयार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य देणार

  • गावात स्वच्छ पाण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी म्हणून वॉटर एटीएम लावणार
  • गावकऱ्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मानस उपचार व वर्षभर सांस्कृतीक कार्यक्रम राबविले जाणार

  • गावकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करावेत! – नाना पटोले

Aprna

अमरावतीत मोठा तणाव, ‘या’ चार जिल्ह्यांतून मागविले पोलीस

News Desk

नारायण राणे सहकुटुंब शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी  ब्रीच कँडीत

News Desk