HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील भाषेतुन पदाचा आदब राखला गेला नाही –  प्रकाश आंबेडकर

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल (१३ ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे सुरु न केल्यामुळे पत्रातुन हिंदुत्वाचा विसर पडला का असा प्रश्न विचारला होता. त्यावरुन राजकारण चांगलेच तापले होते. त्यात आणखी भर म्हणून मुख्यमंत्र्यांनी मला हिंदुत्वासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही असे म्हटे होते. यावरुन भाजपकडून तर विरोध झालाच मात्र इतर पक्षांनीही विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरे उघडा या राज्यपालांच्या मागणीचे समर्थन केले आहे.

राज्यपाल आणि मुख्यमंत्री ही दोन्ही पदे संवैधानिक आहेत. त्यांचा आदब राखला पाहिजे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रातील भाषेवरून हा आदब राखलेला दिसत नाहीये. राज्यपालांच्या पत्रातील मंदिरे उघडा याचच फक्त आम्ही समर्थन करतोय. कारण, केंद्र सरकारने मंदिर उघडा अशी भूमिका घेतलेली आहे. घटनेमध्ये केंद्र सरकारने घेतलेला निर्णय राज्य शासनाला बंधनकारक असतो. आणि म्हणून घटना ही श्रेष्ठ आहे, व्यक्ती नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. या आधी प्रकाश आंबेडकरांनीही पंढरपुरात मंदिर सुरु करण्यासाठी आंदोलन केले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीचे वर्चस्व, राज्यासह जिल्ह्यात भाजपची पीछेहाट

News Desk

“मास्क का वापरू नये? याचे उत्तर राज ठाकरेंनी द्यावे” – संजय राऊत  

News Desk

शरद पवार, रोहित पवारांवरील टीका भोवली, भाजपचे प्रदीप गावडे सायबर पोलिसांच्या ताब्यात

News Desk