HW News Marathi
महाराष्ट्र

ऑपरेशन कमळाबाबत काही सांगता येत नाही पण… – प्रसाद लाड

मुंबई | बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवत सत्ता प्रस्थापित केली. भाजप अनपेक्षितपणे राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. बिहारमधील विजयानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केला होता. तसेच राज्य सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. याबाबत आज (१६ नोव्हेंबर) भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले की, “ऑपरेशन कमळबाबत इतक्यात काही सांगता येणार नाही, पण पक्ष सांगेल ते आम्ही नक्की करु”.

प्रसाद लाड म्हणाले की, “शिवसेनेच्या मनात सरकार पडेल अशी भीती आहे. त्यांचं सरकार त्यांना लखलाभ. तसेच नारायण राणे यांनी ऑपरेशन कमळबाबत जी भूमिका मांडली आहे, त्याबद्दल मला कल्पना नाही. परंतु पक्ष सांगेल ते आम्ही नक्की करु. हे सरकार पाडण्याची इच्छा भाजपच्या कोणत्याही नेत्यामध्ये नाही. सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये आपसातील भांडणांमुळे उपद्रव होईल”.“हे सरकार नोकरबदल्यांचं राजकारण करत आहे”, असा आरोप प्रसाद लाड यांनी यावेळी केला. लाड म्हणाले की, “यावर्षी होणाऱ्या अनेक बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. महाविकास आघाडी सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. अधिकाऱ्यांच्या डोक्यावर सध्या टांगती तलवार आहे”.

दरम्यान, तब्बल आठ महिन्यानंतर पाडव्याच्या मुहूर्तावर आज राज्यातील मंदिरे उघडण्यात आली. भाजप, वंचित बहुजन आघाडीसह विविध पक्ष, संघटना, धार्मिक संघटनांच्या आंदोलनानंतर राज्यातील धार्मिकस्थळे अखेर उघडण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने आज राज्यातील सर्व प्रमुख मंदिरांजवळ जाऊन प्रचंड जल्लोष केला. याबाबत बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, “मंदिरं सुरु करा, अशी आमची मागणी होती, आम्ही त्यासाठी आंदोलनं केली, मोर्चादेखील काढला. अखेर आज सरकारने मंदिरं सुरु केली आहेत. हे या सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हा चांगला निर्णय आहे, परंतु त्यास उशीर झाला. राज्यातील सर्वसामान्य जनता देवाचं दर्शन करेल, त्यांना आत्मशांती लाभेल”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा नाही झाली तर काय होईल हे सांगायची गरज नाही, संभाजीराजेंचा सूचक इशारा

News Desk

नव्या व्हेरियंटच्या धोक्यामुळे राज्यात नवी नियमावली जारी

News Desk

भाजपचं मुंबईत रेलभरो आंदोलन!

News Desk