HW News Marathi
महाराष्ट्र

आता अरविंद सावंतांच्या अवजड खात्याची जबाबदारी महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याकडे

नवी दिल्ली | शिवसेनेचे नेते केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सावंत यांनी काल (११ नोव्हेंबर) राजीनामा देत शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. यानंतर सावंतांच्या मंत्रिपदाचा कार्यभारकेंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. जावडेकर यांच्याकडे या मंत्रालयाचा तात्पुरता कार्यभर असेल. सावंत यांचा राजीनामा आज (१२ नोव्हेंबर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुती तुटू नये म्हणून ५०-५० चा फॉर्मुला ठरवण्यात आला होता. मात्र, भाजपने विश्वासार्हतेला तडा दिला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणून खोट्या वातावरणात का राहायचे असे सांगत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

राजीनाम्यानंतर नेमके काय म्हणाले अरविंद सावंत

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने मी या देशाचा मंत्री म्हणून शपथ घेतली होती. मोदींनी माझ्याकडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रमची जबाबदारी दिली. मी सहा महिने ही जबाबदारी पार पाडली. मात्र, निवडणुकीनंतर राज्यात युतीसंदर्भात ज्याकाही घडामोडी घत आहेत. त्यामुळे युतीच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. महायुतीला जनादेश मिळाला होता. भाजपध्यक्ष आणि भाजपने सत्तेच्या समसमान वाटपाचा दिलेला शब्द पाळला नाही. आपण असा शब्द दिल्याचेही त्यांनी नाकारले. आता राज्यात नव्या समीकरणासह सरकार स्थापन होत आहे. अशा परिस्थितीत केंद्रात मंत्री म्हणून काम करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योगींनी उत्तरप्रदेशमध्ये काय करावे, हा त्यांचा अधिकार…!, अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

एखाद्या विषयावर मतभेद असू शकतात पण महाविकासआघाडीत नाराजी नाही, राऊतांचं स्पष्टीकरण

News Desk

पवारांचे विधान कधीही निरर्थक नसते, मिडियाने यात दखल देऊ नये ! 

News Desk