HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजांनंतर प्रीतम मुंडेंचाही धनंजय मुंडेंवर टीकांचा वर्षाव!

बीड | संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची चिंताजनक होत चालली आहे. बीडमध्येही कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तर दुसरीकडे राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यानंतर आता खासदार प्रीतम मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘पालकमंत्र्यांनी आपलं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला प्रीतम मुंडेंनी धनंजय मुंडे यांना दिला आहे.

प्रीतम मुंडे यांनी आज आरोग्य विभागाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘मी जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून कधी कमी पडणार नाही. जिल्ह्यात औषधांचा तुडवडा असून आरोग्य यंत्रणेवर ताण येतोय. त्यामुळे या गोष्टीकडे सत्ताधाऱ्यांनी बघण्याची आवश्यकता असल्याचं देखील प्रीतम मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे.

तसंच, ‘पंकजाताई पालकमंत्री असताना जिल्ह्याला काही कमी पडलं नाही. आता फक्त श्रेयवादासाठी पुढे येत आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांची दुर्दैवी परिस्थिती असून आताच सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचं विधान प्रीतम मुंडे यांनी केलं आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

दरम्यान, मुंडे भावना-बहिणीतील वाद सगळ्यांना माहित आहेच. पंकजा मुंडे यांच्यानंतर आता प्रीतम मुंडे यांनीही धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. या आधी दोन दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोना लसींचा मोठया प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका करत थेट आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते.

‘बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना आणि पालकमंत्री यांना फक्त माफियांचं हित माहीत आहे,’ असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला होता. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असंही त्या म्हणाल्या. तसंच राज्य सरकारने बीडला केवळ २० डोस दिले आहेत, यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला होता.

‘रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रूग्णसंख्या वाढीत भर पडत आहे. असं असताना जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते मात्र फक्त माफियांना मदत करत आहेत, त्यांना लोकांशी देणे घेणे नाही’, असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्तव्यपथावर ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि’वर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ

Aprna

विरोधकांनी एकत्र येऊन मोदींविरोधात मजबूत संघटन निर्माण करण्याची गरज आहे – संजय राऊत 

News Desk

माजी मंत्री गुलाबराव देवकरांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा मार्ग झाला सुकर!

News Desk