HW News Marathi
Covid-19

बीड जिल्ह्यात आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याबाबत खासदार प्रितम मुंडे यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

परळी | बीड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य

विभाग उत्तम चांगले काम करत आहे. मात्र सध्या जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र आणि उप आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यामुळे कामावर असलेल्या कर्मचारी, अधिकारी वर्गावर खूप ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन बीड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागात रिक्त असलेल्या जागा त्वरीत भरती करून जिल्हावासियांना दिलासा द्यावा अशी मागणी खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्राव्दारे केली आहे.

या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बीड येथे पदे रिक्त असल्याचे लक्षात आले. मागील सरकारच्या काळात पंकजाताई मुंडे यांनी जि. प. आरोग्य विभाग बीड येथे वर्ग-1ची – 125, वर्ग-2ची -20, वर्ग-3 ची- 355 पदे मंजूर केली होती. त्यापैकी 248 पदेच भरली गेलेली आहेत व तेवढीच पदे अद्याप रिक्त आहेत. सर्व साधारण परिस्थितीत कर्मचार्‍यांची कमतरता होती पण आता बीड जिल्हा हा कोरोंनाच्या संकटात आहे, त्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांवर कामाचा प्रचंड ताण येत असल्याचे मुंडे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

सध्या आरोग्य कर्मचारी रुग्णावर उपचार, स्वच्छता, सर्वेक्षण व जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन मध्ये प्रत्येक 100 घरामाघे एक आरोग्य टिम अशा स्तरावर काम करत आहे. त्यामुळे कामावर असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ताण येत आहे. बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाने सक्षमपणे काम करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरती करावीत आणि जिल्ह्याला दिलासा द्यावा अशी विनंती पत्राद्वारे खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व ग्राम विकास मंत्री यांचे कडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोनाधितांचा आकडा ५२१८ तर पुण्यात आत्तापर्यंत ८७ कोरोमामुक्त

News Desk

कोरोना लसीचे २ डोस घेतलेल्यांना बाहेर पडू द्या, अजित पवार मुख्यमंत्र्यांची करणार चर्चा

News Desk

मोदी सरकारने साखर उद्योगाला चालना देशासाठी पवारांनी सुचवले ‘हे’ पर्याय

News Desk