HW News Marathi
Covid-19

पुणेकरांनो थोडी कळ सोसा, वडेट्टीवारांचा सल्ला!

मुंबई | मुंबईत कोरोनाचं संकट कमी होत असल्याने निर्बंध शथील करण्यात आले आहेत. पुण्यात अजूनही निर्बंध शिथिल करण्यात आलेलं नाही. पुण्यात तर परिस्थिती पूर्वपदावर यायला बराच वेळ लागला होता. अजूनही पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात नाही. त्यामुळे पुणेकरांनी थोडी कळ सोसायला हवी, असं आवाहन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

नियमावलीमध्ये पुण्याचा समावेश तिसऱ्या लेव्हलमध्ये

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना आटोक्यात आलेला नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आज नवे कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. या नियमावलीमध्ये पुण्याचा समावेश तिसऱ्या लेव्हलमध्ये करण्यात आलाय. तिसऱ्या लेव्हलमधील नियमांनुसार येथे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील.

तिसरी लाट मोठी असेल असं भाकीत आहे. तसेच आताची स्थितीही सर्वकाही सुरू करावं अशी नाही. त्यामुळे मोठ्या शहरात शिथिलता देताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. याबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असं ते म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी मुंबई लोकलबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

पुणे जिल्ह्यातील निर्बंध कायम

पुणे जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवल्याने नाराजी व्यक्त केली जात असून आता या मुद्द्यावरुन राजकीय वाद होण्याची चिन्हं दिसत आहेत. विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असल्याने या निर्णयामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येणार हे स्पष्ट दिसत आहे. याचसंदर्भातील पहिली ठिणगी ही पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या ट्विटमुळे पडली आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का?, असा प्रश्न मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरुन विचारलाय. मोहोळ यांनी या नव्या आदेशांमध्ये पुण्यातील निर्बंध कायम ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. “पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी ४ टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल तीनचे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे,” असं मोहोळ यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जनाची नाही पण मनाची असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे !

News Desk

महाराष्ट्राला २० कोटी लसींची गरज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अदार पुनावालांशी चर्चा

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र सरकारचे कौतुक

News Desk